निलंगा तालुक्यात वानराच्या हल्ल्यात ५० नागरिक जखमी
निलंगा : तालुक्यातील सोनखेड येथे एका वानराने गेली तिन दिवस झाले आहे धुमाकूळ घातला असून आतापर्यंत यात ५० ग्रामस्थांना चावा घेत जखमी केले . तर दोन गंभीर जखमी झाले असून अनेकांवरती खाजगी व शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.दरम्यान या वानराला पकडण्यासाठी लातूर जिल्ह्यातील वनविभागाचे २५ कर्मचा-यांचे अनेक पथक गावात दाखल झाले आहेत. याकरिता गावात दोन जाळे व दोन पिंजरे आणून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत . मात्र वानर चकवा देत ग्रामस्थासह वनविभागाच्या तीन कर्मच्यार्याचा चावा घेतल्याने नागरिक वनराच्या धास्तीने भयभीत झाले आहेत.