• Wed. Apr 24th, 2024

“देवेंद्र फडणवीस पुन्हा आले, पण…”; कोल्हापुरतील ‘त्या विधानावरून नाना पटोलेंचा टोला!

Byjantaadmin

May 5, 2023

जेव्हा मी सांगतो की मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो आणि मी कसा येतो, हे सर्वांनाच माहिती आहे, असं विधान काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या विधानावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी या विधानावरून फडणवीसांना टोला लगावला आहे.

nana patole criticized devendra fadnavis

नाना पटोले यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्यं केलं. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या विधानाबाबत विचारलं असता, त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. आज काल काय बोलतात, ते त्यांनाही कळत नाही. devendra fadvis हे पुन्हा आले हे खरं आहे. पण ते मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री बनून आले. माझा सारखा व्यक्ती असता, तर खालच्या पद मी स्विकारलंच नसतं, असं ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींबाबतही प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून ज्या घडामोडी घडत आहेत, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. मात्र, मित्रपक्ष म्हणून आम्ही या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेऊन आहोत, असे ते म्हणाले. दरम्यान, काल congress नेते ashok chavan यांनी महाराष्ट्रातही बजरंग दलावर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. यासंदर्भातही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. कोणत्याही संस्था धार्मिक व्यवस्थेपूरत्या असायला हव्या, त्या धर्माच्या नावावर लुटणाऱ्या नको. शेवटी संविधानाने सर्वांना तो अधिकार दिला आहे. मात्र, मागील काही वर्षात काही लोक धर्माच्या नावाने जनतेला लुटण्याचा काम करत आहेत, अशा संघटना नसाव्यात, एवढीच आमची भूमिका आहे, असे ते म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *