• Fri. Apr 19th, 2024

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना ७८ व्या जयंतीनिमीत्त बाभळगावच्या विलासबागेत  जनसमुदाया कडून विनम्र अभिवादन

Byjantaadmin

May 26, 2023

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना ७८ व्या जयंतीनिमीत्त बाभळगावच्या विलासबागेत  जनसमुदाया कडून विनम्र अभिवादन

 

लातूर प्रतिनिधी : शुक्रवार दि. २६ मे २०२३:राजकारणातील एक कर्तबगार, लोकप्रिय नेतृत्व अशी ओळख्‍ स्वकतृत्वाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी निर्माण केली होती. त्यांचा ७८ वी जयंती निमित्ताने बाभळगाव येथील विलास बाग येथे देशमुख कुटूंबिय तसेच मोठया जनसमुदायाच्या उपस्थितीत सार्वजनीक आदरांजली वाहण्यात आली.शुक्रवार दि. २६, मे रोजी सकाळी ९ वाजता विलासबाग, बाभळगाव येथे भावदर्पण हा कार्यक्रम सादर करण्यात आला. लातूरसह राज्यभरात यानिमीत्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदरणीय विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्नेही, मित्र, हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी स्मृती स्थळी पुष्पांजली अर्पण करून आपल्या आवडत्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी ज्या ज्या पदावर कार्य केले. त्या पदाच्या माध्यमातून आपल्या भागातील लोकांचं आणि राज्यातील लोकांच्या जीवनात बदल करण्यासाठी विधायक काम केले, विविध विकासाच्या योजना राबविल्या. राजकारणातील राजकीय वयक्तिमत्व असले तरी प्रारंभीपासून निवडणूकी पुरते राजकारण आणि त्यानंतर फक्त विकासाचं काम करणे हेच  सुत्र त्यांनी पाळले. त्यांच्या या विलक्षण नेतृत्वामूळे शिक्षण क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले. सहकार, कृषी, सिंचन, उदयोग व्यवसाय, मुलभूत सोयीसुविधांच्या विकासातून आर्थिक क्रांती झाली. यामुळे त्याच्या नेतृत्वाला वेगळे वलय प्राप्त झाले आहे.

लोकनेते विलासराव देशमुख यांना विलासबाग, बाभळगाव येथे प्रारंभी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख, विलास साखर कारखाना चेअरमन वैशालीताई देशमुख, सौ. सुवर्णाताई देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, सौ दिपशीखा देशमुख, श्री विनायकराव पाटील, श्रीमती विजया देशमुख, अभिजीत देशमुख, सत्यजीत देशमुख, जयसिंगराव देशमुख, डॉ.सारिका देशमुख यांनी आदरणीय विलासराव देशमुख यांना पुष्पांजली अर्पण केली.

देशमुख कुटूंबियाकडून आदरांजली अर्पन केल्यानंतर माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, अतिरीक्त जिल्हाधिकारी देवरे, चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव, चेअरमन गणपतराव बाजूळगे, सभापती जगदीश बावणे यांनी आदरांजली अर्पन केली.

लोकनेते विलासराव देशमुख यांना अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यामध्ये माजी सभापती ललीतभाई शहा, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी चेअरमन आबासाहेब पाटील, माजी महापौर ॲड.दिपक सूळ, अशोक गोविंदपूरकर, ॲड.व्ही.बी.बेद्रे, बसवराज पाटील नागराळकर, माजी चेअरमन धनंजय देशमुख, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, व्हा.चेअरमन ॲङ. समद पटेल, आरसीसी संचालक प्रा. शिवराज मोटेगावकरसर, ॲड. बी.व्ही.मोतीपवळे, माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, जितेद्र देहाडे, व्हा. चेअरमन प्रमोद जाधव, व्हा.चेअरमन विजय देशमुख, व्हा. चेअरमन रविद्र काळे, माजी महापौर स्मिता खानापूरे, माजी चेअरमन शिलाताई पाटील, मोईज शेख, सिए प्रकाश कासट, रमेश बियाणी, अशोक चोपडे, राजाभाऊ जाधव, जितेद्र देहाडे, व्हा.चेअरमन श्याम भोसले, गणेश एसआर देशमुख, राजेंद्र भोसले, प्रा.शिवाजी जवळगेकर, सपना किसवे, महादेव मुळे, पप्पू देशमुख, प्राचार्य बाबासाहेब गोरे, मन्मथ किडे, लक्ष्मण कांबळे, पृथ्वीराज शिरसाट, व्यंकटेश पूरी, चंद्रशेखर दंडीमे, गोविंद बोराडे, राजकुमार पाटील, कल्याण पाटील, मदन भिसे, राजकुमार जाधव, उपसरपंच गोविंद देशमुख, सुनीता आरळीकर, ज्योती पवार, शिला पाटील, स्वाती जाधव, पुजा पंचाक्षरी, सिमा क्षिरसागर, संगीता मोळवणे, दगडूसाहेब पडीले, लोकमत जिल्हा प्रतिनिधी धर्मराज हल्लाळे, दै.एकमतचे संपादक मंगेश डोंग्रजकर, जयप्रकाश दगडे, अरूण समुद्रे, शहाजी पवार, एजाज शेख, संजय सगरे, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. माधव गादेकर, रामानुज रांदड, इम्रान सय्यद, नबी नळेगावकर, तात्यासाहेब देशमुख, कैलास पाटील, अल्ताफ शेख, सुनील पडीले, हणमंत पवार, पवन देशमुख, अजय वागदरे, गोविंद डूरे पाटील, संजय ओव्होळ, अतुल देऊळगावकर, अनिल चव्हाण,चांदपाशा इनामदार, संभाजी रेडडी, सुर्यभान लांडगे, अशोक (गट्टु) अग्रवाल, कैलास कांबळे, डॉ. गंगाधर डीघोळे, इसरार सगरे, प्रदिप राठोड, सुभाष घोडके, प्रविण सुर्यवंशी, शरद देशमुख, अविनाश बट्टेवार, लक्ष्मण पाटील, ॲड.विजय गायकवाड, जितेंद्र स्वामी, उमाकांत जाधव, चंद्रकांत देवकते,  हकीम शेख, तबरेज तांबोळी, ॲङ देविदास बोरुळे पाटील, प्रा.गोविंद घार, प्रदिपसिंह गगणे, नंदकूमार जाधव, जीवन सुरवसे, असिफ बागवान, जब्बार सगरे, सत्तारभाई शेख, गिरीश ब्याळे, रमेश देशमुख, चंद्रकांत चिकटे, सुंदर पाटील कव्हेकर, राजाभाऊ मोरे, मोहन सुरवसे, अंगद वाघमारे, बालाप्रसाद बिदादा, राम जेवरे, हरी तुगावकर, सचिन सोळूके, हरीराम कुलकर्णी, दिपरत्न निलंगेकर, रविकीरण सुर्यवंशी, चंद्रकांत सांळूके, संतोष तिडके, गुरूनाथ गवळी, मारूती पांडे,अभिजीत इगे, प्राचार्य अजय पाटील, प्राचार्य बुके, सुलेखा कारेपूरकर, शाम भोसले, श्रीनिवास शेळके, सचिन बंडापल्ले, अरविंद भाताब्रे, ज्ञानेश्वर सागावे, विजयकुमार चवळे, विजय टाकेकर, बाबा शेख, विजय टाकेकर, पंडीतराव धुमाळ, डॉ.गंगाधर डिगोळे, बाळासाहेब बिडवे, गोविंद सुरवसे, सिद्राम कटारे,  नागसेन कामेगावकर,  दगडूआप्पा मिटकरी, भारत काळे, धजंजय शेळके, चंद्रकांत मददे, मनोज  चिखले, लिबन महाराज रेशमे, विजयकूमार पाटील, यशवंत वाडीकर, अशोक मगर, मनोज चिखले, ॲड. किसन शिंदे, संजय पाटील खंडापूरकर, नारायण लोखंडे, रमेश थोरमोटे, केशरबाई महापूरे, संगीता मोळवणे, सोनू डगवाले, प्रा.संजय जगताप, मनोज पाटील, बादल शेख, रमेश सुर्यवंशी, चक्रधर शेळके, बिभीषण सांगवीकर, बकंट कदम, सहदेव मस्के, सुर्यकांत सुडे, नरेश पवार, नारायण सोमवंशी, प्रविण घोटाळे, राजेद्र भोसले, नवनाथ काळे, विकास कांबळे, अनुप मलवाड, नाना जाधव, ॲड.बाबासाहेब गायकवाड, भालचंद्र पाटील, यशपाल कांबळे, राजेद्र मस्के, आदीनी आदरांजली वाहीली.

विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमीत्त अभिवादन करण्यासाठी उपस्थित असलेल्या विविध्‍ क्षेत्रातील मान्यवर, संस्थाचे पदाधिकारी, काँग्रेस पक्ष व सलग्न संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी विलासराव देशमुख यांच्या भावपूर्ण आठवणी जागवल्या.   या प्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक मयूर उमेश सुकाळे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भावदर्पण हा कार्यक्रम सादर करण्यात आला, तर सुत्रसंचालन गोंविद केंद्रे व राजेंद्र पाटणकर यांनी  केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *